पुण्यामध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना काल गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आता यावरून चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणे ही संस्कृती भस्मासूर असून, ती महाराष्ट्राला परवडणारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.