Breaking | देशांना दहशतवादाविरोधात एकत्रित येण्याची गरज, एस. जयशंकर यांनी मांडली भूमिका

Breaking | देशांना दहशतवादाविरोधात एकत्रित येण्याची गरज, एस. जयशंकर यांनी मांडली भूमिका

| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 19, 2021 | 9:45 PM

दहशतवादावर दुहेरी भूमिका चालणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना रोखलं पाहिजे. अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी UNSC बैठकीत भारताची रोखठोक भूमिका मांडली आहे. जगातील देशांना दहशतवादाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलंय. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय.

दहशतवादावर दुहेरी भूमिका चालणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना रोखलं पाहिजे. अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी UNSC बैठकीत भारताची रोखठोक भूमिका मांडली आहे. जगातील देशांना दहशतवादाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलंय. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव (Afghanistan new name) ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय.

Published on: Aug 19, 2021 9:45 PM
Follow Us