रवी खरात, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर बोलले. शिवाय त्यांनी महाविकास आघाडी सरकार (Uddhav Thackeray) आणि शिंदे सरकारमध्ये फरक सांगितला. आपलं सरकार हे गरीबांचं आणि माथाडी कामगार तसंच सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. मागच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही महत्वाचे निर्णय घेतले. आमच्या सरकारचा अजेंडा फक्त सर्वांना न्याय देणं आहे. आमचं सरकार दुजाभाव करत नाही. करणार नाही, असं शिंदे म्हणालेत.