सांगली : भारतीय जनता पक्षात जाण्याच्या चर्चेवर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्पष्टच सांगितले. किती वादळे आली तरी देशमुख वाडा तेथेच राहणार आहे, असे सांगत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला. सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. परंतु सरकार वैध की अवैध याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयात लागणार आहे. म्हणजे राज्यात चौथे सरकार कधीही येऊ शकते, आधी पाहटेच्या शपथविधीचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. आता हे तिसरे सरकार कधीही जाऊ शकते, असे अमित देशमुख यांनी म्हटले.