आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. तीन दिवस अधिवेशन वादळी ठरले. अपेक्षप्रमाणे चौथा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत. आज देखील अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. आज मुंबईच्या रस्त्याच्या प्रश्नावरून योगेश सागर यांनी वादग्रस्त वक्तव्य विधान केल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. मुंबई शहरामध्ये रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं. याच विषयावर बोलताना योगेश सागर यांनी वादग्रस्त विधान केले आहे.