मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकारावर भाष्य केलं आहे. त्यांनी सहकारी चळवळ संकटात आली असल्याचं मत व्यक्त केलं. आज साखर निर्माण करतानादेखील खासगी क्षेत्रांत स्पर्धा निर्माण झाली. आज देशात खासगीकरणाचा पुरस्कार केला जातोय. त्यामुळे आता सहकार चळवळ क्षीण होत चालली आहे. देशातील लहान गरिबांनी एकत्र येऊन ताकद निर्माण करणे म्हणजे सहकार होय, असे जयंत पाटील म्हणाले.