सहकार क्षेत्र आणि सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून सहकारी साखर कारखान्यांसाठी एक नवसंजीवनी मिळेल असा दावा फडणवीस यांनी या बैठकीनंतर केलाय. त्याचबरोबर फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत दूजाभाव केला जात असल्याचा आरोपही केला आहे.