मुंबई : पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ममता यांच्या दौऱ्यात मोदी यांच्याविरोधात विरोधी आघाडी उभारण्यावर चर्चा करण्यात आली. आता या दौऱ्यावर राज्यातील भाजप नेते गंभीर टीका करत आहेत. ममता बॅनर्जी यांचे स्वागत होते. मग भूपेंद्र पटेल यांचे का होत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.