चित्त्यावरून शिवसेनेचा भाजपला(BJP)खोचक सवाल भाजपने चित्ते आणले म्हणून त्यांना आम्ही चिता सरकार म्हणायचे का? राणीच्य बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्हा चिता सरकार म्हणायचे का असा खोचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केला आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik )याच्या केस वरूनही भाजपवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहेका? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.