आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. “जगाला हेवा वाटावा, अशी भारताची वाटचाल सुरु आहे. मागील 9 वर्षातील कामामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.भारतात वेगवान आणि निडरपणे काम करणारं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे चांगली कामं होत आहेत. सबका साथ सबका, सबका विकास हेच मोदी सरकारचं ध्येय आहे”, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत.