“मला सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. कारण मंत्रिमंडळाचा जेव्हा शपथविधी झाला, तेव्हा ते माझ्यासोबत होते. त्यांच्याबद्दल अशी बातमी येईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. मराठी आऱक्षणासाठी मोठं काम त्यांनी राज्यभरात सुरू केलं होतं. फक्त मराठा आरक्षणच नाही, तर इतर अनेक सामाजिक कार्य त्यांनी हाताळले होतं. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता, असा मी उल्लेख करेन. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी एवढी मोठी मजल घेतली होती”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.