शंकर देवकुळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मनात प्रचंड भीती होती. काहीतरी बाहेर येईल. काही तर बोललं जाईल, असं त्यांना वाटत होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. जिल्हा नियोजन बैठकीला माझ्याप्रमाणे विधान परिषद आमदारांना जयंत पाटील बोलवत नव्हते. इतका सत्तेचा माज चांगला नसतो”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.