महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. मात्र, या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.गोपीचंद पडळकर म्हणाले की, संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत बोला. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्या पडळकर म्हणत आहेत की, मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करायला घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे, कारखाने कवडीमोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत.