सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

| Updated on: Sep 06, 2026 | 10:50 AM

संजय राऊत यांनी भाजप सरकारवर प्रशासनाचे "संघीकरण" केल्याचा आरोप केला. त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. तसेच, गुलाबराव पाटील हे सत्ता बदलताच शिंदे गट सोडून येतील, असे भाकीत राऊत यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (MPSC) अन्य संवैधानिक संस्थांमध्ये “भाजपधार्जिण्या” लोकांची नियुक्ती करून प्रशासनाचे “संघीकरण” केले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी राम मंदिर ट्रस्टच्या सीईओपदाच्या उदाहरणातून नोकरशाहीतील पक्षपातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी देशातील महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदींनी बाजारात जाऊन सामान्य माणसाची परिस्थिती पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या दोन वर्षांत ७,५०० शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगत, सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. याशिवाय, राऊत यांनी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही भाष्य केले. गुलाबराव पाटील यांनी भाजप ज्या पद्धतीने पक्ष फोडते, तसेच शिक्षकांनी विद्यार्थी फोडावेत असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “सत्ता बदलल्यावर गुलाबराव पाटील हा नेताच पक्षातून पहिली उडी मारणारे व्यक्ती असतील.” त्यांच्या या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा आहे.

Published on: Sep 06, 2026 10:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us