मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरांना तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. आता पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातही पोहचला असून मागील दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने तलाव भरले आहेत. कळंबा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. पचगंगा नदीच्या पातळीतही वाढ झाली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.