मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काहींनी 227 चा नारा दिला. पण, आमचा नारा हा मुंबई महापालिकेसाठी 150 राहणार असल्याचं किशोरी पेंडणेकर म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षात लहानाचं मोठं होत गेलो. आम्ही राजकीय फायद्यापेक्षा आम्ही सामाजिक ऐक्य आणि फायदा हेच बघत आलो आहोत. त्यामुळं संभाजी ब्रिगेडसारखे अनेक लोकं सहभागी झालेत. हिंदुत्वासाठी खऱ्या अर्थानं बाळासाहेब आणि उद्धव हेच लढले. पण, हिंदूत्व प्रत्येकाच्या मनामनात आहे. हिंदुत्व हा जगण्यासाठी आहे. हिंदुत्व हा मानसिक तयारीनं केलेला धर्माचा संदेश आहे. तेजस ठाकरे हे मुंबई मनपात एंट्री करतील की, नाही ते त्याचे वडीलच सांगितलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.