महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आता यासर्व प्रकरणानंतर अण्णा हजारे यांनी यावर प्रक्रिया दिली असून त्यांनी ईडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच इतर 49 साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.