सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची चौकशी बंद होणार नाही की नाही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली आहे. तसेच त्यांनी यावेळी जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही असे म्हटले आहे. यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना अजित पवार यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी बंद होणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही असे म्हटलं आहे. तर जाणीव पुर्वक ज्या राजकीय दृष्ट्या चौकशा होणार आहेत त्या होणार नाहीत असेही स्पष्टीकरण ही फडणवीस यांनी दिलं आहे. तर यावेळी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधताना, त्यांना झटके येत असतात, त्यामुळे ते अशी टीका करतात असे ही फडणवीस म्हणाले.