एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. तसेच या बंडखोरीमध्ये अनेक मंत्र्यांचाही समावेश आहे. शासन कार्यनियमावली नियम क्रमांक 15 मध्ये मंत्र्यांची कर्तव्य आणि कामांची माहिती दिली आहे. एकूण 58 आदेश या नियमावलीत देण्यता आले आहेत. दर आठवड्याला आपल्या विभागातील प्रत्येक प्रकरणे निकाली काढण्याची जबाबदारी मंत्र्यांवर असेल. त्यानुषंगाने त्यांना निर्णय घेणे बंधनकारक असेल.शेड्यूल 3 नुसार मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. कर्तव्यात कसूर न करण्याची आणि कर्तव्यालाच प्राधान्य देण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. त्यामुळे राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्री आणि त्या त्या विभागाच्या मुख्य सचिवांनना कल्पना देण्याची आवश्यकता असते. तसेच आपल्या खात्याचा प्रभार इतरांकडे सोपवणे आवश्यक असते.