कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. माझं याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यानंतर हा निर्णय मी तुम्हाला सांगत असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा मोठा निर्णय आहे. दरम्यान, गावात आलेल्या चाकरमान्यांच्या तपासणीबाबत ग्रामकृतीदलांना आदेश दिलेले असून चाकरमानी आणि गावच्या लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
प्रोफेशन कोर्स सी इ टी परीक्षा कोव्हीड नियम पाळून पार पडणार आहे. CET परीक्षा झाल्यावर 1 नोव्हेंबर पासून कॉलेज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे उदय सामंत म्हणाले. CET 15 सप्टेंबर ते 10ऑक्टोबर कालावधीत होणार असून, 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. CET च्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा 10 हजारने वाढ झाली आहे. ज्या दिवशी मुंबई अथवा अन्य ठिकाणी परीक्षा असतील त्यादिवशी त्यांना रेल्वे प्रवेश देण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करू, असे देखील उदय सामंत म्हणले आहेत. तसेच ओळखपत्र दाखवून विद्यार्थांना रेल्वे प्रवास करता येणार आहे.