Marathi News Videos Maharashtra Aurangabad Rain Villagers Human Chain to Rescue School Going Students in flood water

Aurangabad Flood | मानवी साखळी करून विद्यार्थ्यांची सुटका, औरंगाबादेत रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुटका केली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांची सुटका केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते. मात्र गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला धाव घेतली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी करत गावकऱ्यांनी चिमुरड्या विद्यार्थ्यांची सुटका केली. गावकऱ्यांनीच अंगाचा थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन राबवल्याने कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Related Video
समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी? बैठकीला आल्याने चर्चांना उधाण
महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?
Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, मग करा हे सोपे उपाय
चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...