Acharya Devvrat | अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात, पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्धार; राज्यपालांचे अधिवेशनात स्पष्ट संकेत
महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबई येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सभागृहाला संबोधित करत राज्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर दिला.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबई येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सभागृहाला संबोधित करत राज्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर दिला. राज्याची आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी नागरी तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य असून भविष्यातही या क्षेत्रात अधिक प्रगती साधण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, रोपवे, रेल्वे, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भातही माहिती दिली. सरकारने 2 लाख 39 हजार लाभार्थी शेतकऱ्यांकडून 60 लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इ-राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत अंतरराज्य आणि अंतरबाजार व्यापार सुलभ करण्यासाठी आणि राष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठांच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
