महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय : Jitendra Awhad

महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय : Jitendra Awhad

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 7:01 PM

गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंध एकमतानं उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंध एकमतानं उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीनं जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय रमझान ईदचा सण उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका जोरात काढा, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.