मुंबई : राज्यात उद्यापासून (1 मे) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेसाठी लागणाऱ्या सर्व लसी एका रकमेत एका चेकमध्ये घेण्याची राज्याची तयारी आहे, असे सांगितले. तसेच राज्यात तिसरी लाट आली तरी यावेळी जी हानी झाली तर ती नंतर होणार नाही, असे ते म्हणाले. ऑनलाई संवाद साधत असताना त्यांनी लसीकरणाचा प्लॅन काय असेल यावरुसुद्धा भाष्य केले. पाहा उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण संवाद…….