Marathwada Flood : मराठवाड्यात जलप्रलय, गावं पुरानं वेढली, जनावरं दगावली अन् बळीराजानं हंबरडा फोडला

Marathwada Flood : मराठवाड्यात जलप्रलय, गावं पुरानं वेढली, जनावरं दगावली अन् बळीराजानं हंबरडा फोडला

Harshada Shinkar | Updated on: Sep 23, 2025 | 6:07 PM

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक गावांना पाण्याने वेढले आहे.

मराठवाड्यात सध्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 7 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून, एकूण 21 लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांना पाण्याने वेढले आहे आणि जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. मोहळ तालुक्यातील भोईरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बांधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. जालना जिल्ह्यातही पावसाचा फटका बसला असून शेकडो हेक्टरवरची पिके पाण्याखाली गेली आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमधील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Published on: Sep 23, 2025 6:07 PM
Follow Us