Raj Thackeray : आजचा मोर्चा राग, ताकद दाखवण्याचा – राज ठाकरे

Raj Thackeray : आजचा मोर्चा राग, ताकद दाखवण्याचा – राज ठाकरे

| Updated on: Nov 01, 2025 | 3:28 PM

राज ठाकरे यांनी मतदार यादीतील दुबार मतदारांच्या मुद्द्यावर सत्याचा मोर्चाचे नेतृत्व केले. हा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्यासोबतच दिल्लीपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षांनीही याच मुद्द्यावर आवाज उठवल्याचे नमूद करत, निवडणूक घेण्याची घाई का, असा प्रश्न उपस्थित केला.

राज्यातील मतदार यादीतील अनियमितता, विशेषतः दुबार मतदारांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. हा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा आणि दिल्लीपर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्याचा आहे, असे ते म्हणाले.

या मोर्चाचा मुख्य विषय मतदार यादीतील दुबार मतदारांचा आहे. राज ठाकरे यांनी नमूद केले की, उद्धव ठाकरे, शरद पवार, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मतदार यादीतील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतदारांची समस्या असतानाही निवडणूक घेण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व बांधवांचे आभार मानले.

Published on: Nov 01, 2025 03:28 PM