ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ… राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत असताना, तर काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र आहे.
पुढील काही तासांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
