मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राजकीय युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती संबोधत, ५० खोके प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने शहराची दुरवस्था आणि वाढते प्रदूषण यावर त्यांनी चिंता व्यक्त करत, मुंबईकर म्हणून मला लाज वाटते असे म्हटले आहे.
अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीवर आणि महाराष्ट्रातील राजकारणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सध्याच्या राजकीय युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती असे संबोधत, नेत्यांवर केवळ मालकाचे ऐकण्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी अजित पवारांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत, आता ते पुरावे का देत नाहीत, असा सवाल मांजरेकरांनी केला.
मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी ५० खोके म्हणजे ५० कोटी रुपये आणि ४० आमदारांसाठी २००० कोटी रुपये कुठून आले, याबाबत स्पष्टीकरण मागितले. तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने मुंबई धोक्यात होती का, असा विचार मांजरेकरांनी मांडला. एक मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना त्यांना लाज वाटते, कारण आजचा वायु गुणवत्ता निर्देशांक १८३ पर्यंत पोहोचला आहे. नियोजनशून्य विकास आणि वाढत्या प्रदूषणामुळे शहराचे भविष्य धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
