महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्ती असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीते पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेत उडी घेत या भेटीमध्ये कोणीही राजकारण पाहू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.