गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरामध्ये जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या बघाला मिळतो आहे. यामुळे रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना मोठा तारेवरची कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे देखील अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. रस्त्यावर येणाऱ्या जनावरांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे. कारण रस्त्यावर बसलेल्या जनावरांच्या गर्दीतून वाहन काढणे धोकादायक बनले आहे.