मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे युवा नेते, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरे काहीही बोलू शकतात. जोपर्यंत त्यांचे दोन ते चार हात होत नाही तोपर्यंत त्यांची विधानांना आम्ही गंभीर्याने घेणार नाही. त्यांना एवढाच सल्ला द्यायचाय की त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं”, असं असं भरतशेठ गोगावले म्हणाले आहेत. भरतशेठ गोगावले यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. गोगावले यांच्या या सल्ल्याला आदित्य ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं असेल.