मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर सरकारकडे कोणता प्लॅन आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. तसेच ज्या भागात रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करा, असा सल्लासुद्धा न्यायालयाने दिला. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…