महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळा (Mumbai School Reopen) आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं याअगोदर ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आता मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत.