Mumbai Water Cut : मुंबईकरांनो, पुढचे दोन दिवस पाणी जपून वापरा. कारण दोन दिवस तुम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. उद्या आणि परवा अर्ध्या मुंबईत पाणी पुरवठा बंद असणार आहे. नवीन जलजोडणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. मुंबईच्या 12 वार्डमध्ये 30 आणि 31 जानेवारी या 2 दोन दिवस पाणी पुरवठी बंद असणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.