मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे बजेट अर्थहीन असल्याचा आरोप केला. तसेच देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.