रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मी असतो तर कानशिलात लगावली असती असं नारायण राणे म्हणाले होते. याप्रकरणी राज्यभरात राणेंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाशिक पोलीस, पुणे पोलीस कोकणात दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.
संबंधित बातम्या