नवी दिल्ली : राजधानी दिल्लीकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्या प्रकरणावर दोन दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष सुनावणी 2 दिवसांत संपणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज आणि उद्या 2 दिवस युक्तिवाद होणार आहे. या 2 दिवसातील आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. उद्या दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे उद्याच सत्तासंघर्ष बाबतच्या निकाल येण्याती शक्यता आहे. मात्र हा निकाल उद्या येणार की निकाल राखून ठेवला जाणार हे पाहणं महत्वाचं असेल.