VIDEO : Nawab Malik | सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याच कटकारस्थान; नवाब मलिकांचा आरोप

| Updated on: Aug 08, 2021 | 1:56 PM

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही.

Follow us on

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा आरोप वाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते.