मुंबई : अंबरनाथच्या डीएमसी डम्पिंग ग्राउंडला मोठी आग लागल्याने रेल्वे रुळांसह परिसरात धुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. तर डम्पिंगला वारंवार आग लागत असल्याने बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. हवामान बदलामुळे राज्यात अवकाळी झाला. त्यामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. बुलढाण्यातील सर्व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी ने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. नागपूरमध्ये फेसबुकवर जॉबची ऑफर देत मुलींची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये गुळाचे उत्पादन घटल्याने किंमतीमध्ये वाढ झाली आहे. गुळाच्या किंमतीमध्ये प्रतिक्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली आहे.