अहमदनगर, 5 ऑगस्ट 2023 | अहमदनगरमधील राहुरीमध्ये आज सकल हिंदु समाजाने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. उंबरे गावातील लव्ह जिहादच्या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात राहुरीत जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून आलं. या मोर्चामध्ये नितेश राणे लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतरसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली.