भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ही टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली. त्यांनी खालच्या पातळीचे शब्द वापरलेत. “उद्धव ठाकरेमध्ये काहीही करण्याची हिंमत नाही, कारण तो नामर्द आहेत. त्यामुळे त्याला अनिल परबसारखे कारकून लागतात”, असं नितेश राणे म्हणालेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केलीय.