मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे सांगितले जात आहे. तर दिसरीकडे लवकरच कॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर सध्यातरी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार नसून निर्बंध आणखी कडक करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, अशी माहिती मिळत आहे.