राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…
भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत.
भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत.
अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. आता ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून ते महायुतीचा एक भाग झाले आहेत. यावर आता राणा जगजितसिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘ओमराजेंसह सहा खासदारांचं महायुतीत स्वागत आहे, ते आता एनडीएत आल्याने विरोधक राहिले नाहीत… याबाबत जेव्हा ओमराजेंनी वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला, इतकेच नाही तर त्यांनी पाटील कुटुंबाचा नेहमीच विरोध करणार असं सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे राणा जगजीत पाटली कोणत्याही पक्षात असले तरी विरोधकच असतील असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, त्यांचं राजकीय अस्तीत्वच मला संपवायचंय…
