परमबीर सिंह भारतातच असल्याचा दावा पुनीत बाली यांनी कोर्टात केला. ते फरार नाहीतय मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंह समोर येत नाहीत.परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे. या खटल्याचा तपास सीबीआय कडून व्हावा, अशी मागणी परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर मी चूक केली असेल तर माझ्यावर देखील कारवाई व्हावी, असं सिंह यांच्यावतीनं सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं. परमबीर सिंह यांनी पाठवलेले पत्र मागे घ्यायला सांगितलं गेलं आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहायला सांगितलं. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.