जळगाव : हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar ) यांनी पूर्वी लोकप्रतिनिधीचे इलेक्टिव्ह मेरिट (Elective Merit) हे त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होतं. पण आज ते तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत मांडलं आहे. सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात (Jalgaon) आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असेही त्यांनी सांगितले.