सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. पुढे राज ठाकरे म्हणाले की, हे प्रत्येकवेळेला तुम्हाला गृहित धरणार आहेत. राज ठाकरे म्हणाले की, कोणी कोणाला भेटतंय. शिवसेनेतील कोण म्हणालं की आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार जाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय.