Raigad Taliye Landslide | आख्खं गाव स्मशान झालं… अन् एकच आक्रोश

Raigad Taliye Landslide | आख्खं गाव स्मशान झालं… अन् एकच आक्रोश

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 24, 2021 | 1:24 PM

तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.

तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.

Follow Us