मुंबई : कोकणात (Kokan) पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Rain)शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासून रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडत आहेत. आज सकाळपासून रत्नागिरीकरांना सूर्य दर्शन झाले नाही. किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.