मुंबई: केंद्र सरकारने 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी थेट सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत सिरम इन्स्टिट्यूटशी (Serum institute) बोलणी सुरु केली तेव्हा केंद्र सरकारने लसींचा आगाऊ साठा अगोदरच आरक्षित करुन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तर आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घालण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.