रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी देखील रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. सकाळी सात वाज्यापालून विजांच्या कडकडाटांसह पावसानं (Rain In Ratnagirir) हजेरी लावली. दरम्यान, या अवकाळी पावसाचा आंबा (mango) आणि काजू बगायतदारांना मोठा फटका बसला आहे. आंब्यावर पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे रत्नागिरीकरांच्या अंगाची लाही होतेय.